‘कृषी उडान योजना 2.0’ ; शेतीमालाला मिळेल बाहेरची बाजारपेठ, जाणून घ्या कसा कराल अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी पीक काढतो, पण त्याच्यासमोर प्रश्न येतो की ते विकायचे कुठे? सामान्यत: शेतकर्‍यांना त्यांचे पीक विकण्यासाठी बाजारात जावे लागते, परंतु काहीवेळा पीक योग्य वेळी बाजारात न पोहोचल्यास पीक उद्ध्वस्त होते.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होते. यासाठी शासनाने ‘कृषी उडान योजना’ सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल …

कृषी उडान योजनेचा उद्देश

राष्ट्रीय महामार्ग, आंतरराष्ट्रीय महामार्ग आणि हवाई मार्गाच्या साहाय्याने पीक थेट बाजारपेठेत नेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे पीक वाया जाण्यापासून वाचता येईल आणि त्यांना त्याचा लाभही मिळू शकेल. या योजनेमुळे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीचा अभाव दूर झाला आहे.तुम्हीही शेतकरी असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

कृषी उडान योजनेचे फायदे

१)देशाच्या विविध भागातून इतर ठिकाणी कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी विमानतळांचा वापर केला जाईल.
२)या योजनेचा लाभ शेती मालाबरोबरच मत्स्यउत्पादन, दुग्धोत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थ, मांसासारख्या व्यवसायात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.
३)शेतकरी आपला माल वेगवेगळ्या राज्यात विकू शकतील.
४)शेतकरी आपले पीक वेळेवर विकू शकतात.
५)पिके वाया जाण्यापासून वाचतील.
६)हवाई वाहतुकीने उत्पादने आणणे व नेणे यामुळे व्यवसायही वाढेल आणि शेतकऱ्यांनाही चांगला नफा मिळेल.
७)विमानातील निम्म्या जागांवर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे
–आधार कार्ड

–शिधापत्रिका

–पत्त्याचा पुरावा

–बँक पास बुक

–जमिनीची कागदपत्रे

–उत्पन्न प्रमाणपत्र

–पासपोर्ट आकाराचा फोटो

–मोबाईल नंबर

अर्जाची प्रक्रिया

–सर्वप्रथम, तुम्हाला कृषीच्या अधिकृत वेबसाइट agriculture. gov.in वर जावे लागेल.

–आता होम पेजवरच कृषी योजनेचा पर्याय दिसेल.

–यानंतर कृषी उडान योजनेचा अर्ज उघडेल.

–या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा जसे नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि पीक संबंधित माहिती.

–हा फॉर्म भरल्यानंतर सबमिट करा.