हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाचा चटका वाढला असून तापमानातही वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 36 अंश सें.ग्रे. तापमानाची (Weather Update) नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारपर्यंत (दि. 10) तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता (Weather Update)
राज्यात नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असून आज (दि. 8) सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची (यलो अलर्ट) शक्यता (Weather Update) आहे तर उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.
सोयाबीन पिकाची काळजी घ्या- पंजाब डख
जे शेतकरी सोयाबीन पिकाची काढणी करत आहेत, त्या शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत (दि. 9) काढलेले सोयाबीन झाकून ठेवावे. आजपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दि. 9 ऑक्टोबरपासून भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा परतीचा पाऊस असल्याने पावसाचा जोर राहण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले आहे.