हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा हा 35 अंशांच्या पुढे सरकला आहे. गुरुवारी दिनांक 24 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर सोलापूर, नगर, जळगाव येथे देखील 37अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यांमध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी निफाड 10.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अकोला, सोलापूर, नगर, रत्नागिरी ,परभणी, जळगाव, अमरावती, वर्धा ,यवतमाळ या जिल्ह्यात 36 अंश यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली असून उन्हाचा चटका अधिकच वाढला आहे. उन्हापासून बचावासाठी दुपारी शक्यतो बाहेर निघण्याचे टाळा आणि योग्य काळजी घ्या.
दरम्यान मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून नागालँड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिणा अंतर्गत कर्नाटक मधील वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. उत्तर पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये वजांसह पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत असल्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे.
राज्यातील कमाल तापमान
राज्यात सर्वाधिक अकोला इथं 37.8 ,सोलापूर 37.4, नगर 37.4, जळगाव 37.3, पुणे 35 पॉईंट सात ,सांगली 35.4, सातारा 34.5, कोल्हापूर 34.36, मालेगाव 35.4, नाशिक 35.5, सांताक्रुज 32.2, रत्नागिरी 36, औरंगाबाद 19.9, परभणी 36.6, ब्रह्मपुरी 35.5, वाशिम 31, आणि यवतमाळ 36 डिग्री सेल्सिअस असं कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे.