Weather Update : 24 तासांत ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 23 March 2024 Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : होळीचा सण अवघा एक दिवसावर येऊन ठेपला आहे. अशातच आता महाराष्ट्रासह देशातील वातावरणाचे रंग (Weather Update) देखील बदलताना दिसत आहे. एकीकडे महाराष्ट्रासह पश्चिमेकडील राज्यांमध्ये उन्हाचा चटका वाढत आहे. याउलट देशाच्या दक्षिणेकडील, पूर्व किनारपट्टीवरील राज्य, ईशान्येकडील भाग आणि हिमालयीन पट्ट्यामध्ये पावसाचे वातावरण कायम आहे. पुढील तीन दिवस या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याउलट महाराष्ट्रात मात्र पावसाचे वातावरण (Weather Update) निवळले असून, उन्हाचा तडाखा वाढला आहे.

‘या’ राज्यांना आयएमडीचा इशारा (Weather Update Today 23 March 2024 Maharashtra)

भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, पुढील २४ तासांमध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २३ ते २६ मार्च दरम्यान देशात अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये २३ ते २६ मार्च या कालावधीत ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा होण्याचा अंदाज आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये बर्फवृष्टी देखील होऊ शकते. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

राज्यात उकाडा वाढला

राज्याच्या पूर्वेकडील भागातील पावसाचे वातावरण निवळले असले तरी तापमानातील वाढ कायम आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात ३८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यात गडचिरोली, गोंदिया वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांत ३५ अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले आहे. अर्थात पावसाच्या वातावरणानंतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान काहीसे कमी झाले असून, तर मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये तापमानाचा पारा ३८ अंशांवर आहे. त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये उकाडा वाढला असून, वाढत्या तापमानामुळे नागरिक बेजार झाले आहे.