Weather Update : पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; आज ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

Weather Update Today 13 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ (Weather Update) सुरूच आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा सर्वदूर पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Weather Update Today 13 May 2024)

आज (ता.13) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सांगली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.

बिहारमध्ये वीज पडून 11 जणांचा मृत्यू

दरम्यान, सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पाऊस पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासांत वीज पडून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजही (ता.13) आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, केरळ, कर्नाटक, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही हलका पाऊस पडेल. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

अनेक भागांमध्ये उकाडा कायम

राज्यात पावसाचे वातावरण असेल तरी, काही भागांमध्ये उकाडा देखील कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील सोलापूर या ठिकाणी सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर धुळे 40, मालेगाव 41, नांदेड 40.4, परभणी 41.1, अकोला 42.5, अमरावती 41, चंद्रपूर 42, वर्धा 41.5, वाशीम 41.4, यवतमाळ 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.