हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो राज्यात सध्या वाढत्या तापमानाने कहर केला आहे. दिवसाच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून राज्यातल्या बऱ्याच ठिकाणचे तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याकडून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आता कुठे मार्च महिना मध्यावर आला असताना तापमानात मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात काय होईल ? अशी चर्चा सध्या शहरापासून ते गावाच्या परापर्यंत रंगली आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या इशारा
सुरवातीला मुंबईसह कोकण किनारपट्टी भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. अद्यापही कोकण किनारपट्टी भागात तापमानाचा पारा वाढलेलाच असताना आता विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी विदर्भातील अकोला जिल्ह्यतात ४२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील अकोला मध्ये 42. ७, अमरावती 41. ४, बुलढाणा 39.8 ब्रह्मपुरी ४०. ४, नागपूर 40 डिग्री सेल्सियस वर्धा 4१.4 अशी कमाल तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. तर चंद्रपुरात चंद्रपुरात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील कमाल तापमान
विदर्भातील अकोला मध्ये 42 पॉईंट सात अमरावती 41 पॉईंट चार बुलढाणा 39.8 ब्रह्मपुरी चाळीस पॉईंट चार नागपूर 40 डिग्री सेल्सियस वर्धा 43.4 अशी कमाल तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. तर औरंगाबाद 40, परभणी 41.2, नांदेड 40, जळगाव 42.6, कोल्हापूर 39.5, मालेगाव 40.1, सांगली 40.5, सातारा 38.5, सोलापूर 41. 6