हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात (Weather Forecast) आजपासून पुढील आठवडाभर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक (Weather Forecast) यांनी वर्तवविला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होत आहे. एका बाजूला तापमानात (Temperature) वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पाऊस (Rain) पडत असल्याचेही चित्र दिसत आहे.
मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आजपासून पुढील आठवडाभर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. 16 मे पर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता आहे. या काळात वीज, वारा, पाऊस, गारा (Hailstorm) पडण्याची शक्यता (Weather Forecast) देखील वर्तवण्यात आली आहे.
मध्यम अवकाळी पावसाची शक्यता (Weather Forecast)
राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आजपासून पुढील आठवडाभर म्हणजे गुरूवार 16 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी गडगडाटीसह वीज, वारा, गारांसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात रविवार 12 मे पासून त्यापुढील 5 दिवस म्हणजे गुरूवार दिनांक 16 मे पर्यंत मध्यम अवकाळी पावसासोबत गारपीटीची शक्यताही नाकारता येत नसल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात पावसासह गारपीटीची शक्यता
पुढील पाच दिवसात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर म्हणजे गुरूवार 16 मे पर्यंत सरासरी इतका म्हणजे 35 व 25 डिग्री से. ग्रेड दरम्यानचे कमाल व किमान तापमान (Temperature) राहणार आहे. तिथे उष्णतेची लाट (Heat Wave), दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस इत्यादी सारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नसून केवळ स्वच्छ उन्हाळी वातावरण असेल असा अंदाज आहे (Weather Forecast).
अहमदनगरसह नागपूरमध्ये जोरदार पाऊस
अहमदनगरसह नागपूर मध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र फळबागांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जरी तापले असले तरी अवकाळी पावसामुळे निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदारांना महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवणार नाही हे विशेष. सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान उरकल्यास त्यांना अवकाळी वातावरणाचा कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नाही.